शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘नाबार्ड’ने दिले.. शासनाने अडविले..! पुनर्वसनासह धरणही रखडले : वीस वर्षांत एकही बंधारा नाही; लाभक्षेत्रातील शेतकºयांना कसे मिळणार पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:38 IST

रवींद्र येसादे ।उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी नाबार्डकडून ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात रक्कम मिळालेली नाही. कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्याचे नियोजन असताना एकही बंधारा अद्याप बांधलेला नाही. श्री शंकराचार्य पीठाच्या करपेवाडी येथील जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याच्या कारणामुळेही पुनर्वसनास ...

रवींद्र येसादे ।उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी नाबार्डकडून ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात रक्कम मिळालेली नाही. कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्याचे नियोजन असताना एकही बंधारा अद्याप बांधलेला नाही. श्री शंकराचार्य पीठाच्या करपेवाडी येथील जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याच्या कारणामुळेही पुनर्वसनास विलंब होत आहे.सध्या प्रकल्पाच्या सांडव्याचे ८० टक्के काम झाले आहे. सांडवा २०५० मीटर ते २१३० मीटर भागात १६० मीटर लांबीचा दरवाजा नसलेला डकबिल पद्धतीचा उत्सारित भाग प्रमाणित आहे. ओगी व राफ्टभागाचे संधानकाचे काम वगळता सांडव्याचे काम ७५ टक्के पूर्ण आहे, तर ११७० मी. लांबीच्या पुच्छ कालव्याचे काम ८० टक्के पूर्ण आहे.

सिंचन तथा विद्युत विमोचक असून, शुष्क विहिरीचे पूर्ण ट्रॅश रॅक उभारणीचे काम ९५ टक्के इतकेच झाले.संपूर्ण धरण मातीचे असल्यामुळे लांबी १९७५ मी., उंची २७.७८ मी. आहे. त्याचे काम ७५ टक्के झाले आहे. धरण माथा पातळी ६९०.२३ मी. उजव्या तीरावरील ५०० मी. ते १२०० मी. व डाव्या तीरावरील १३३० मी. ते २०५० मी. व ६८७.०० मी. पर्यंत काम पूर्ण आहे. धरणाचे उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी प्रकल्पास नाबार्डकडून ४९ कोटी मंजूर आहेत. त्यापैकी १८.८८ कोटी मिळाले ते इतर कामासाठी वापरण्यात आले.

श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठाची जमीन संपादनाविषयीचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने करपेवाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. गडहिंग्लज परिसरातील लाभक्षेत्रातील जमीन संपादनाला काही शेतकºयांनी स्थगिती आणली आहे. त्यामुळे पर्यायी जमीन उपलब्ध होणे अडचणीचे बनले आहे. धरणासाठी विशेष कायदे असूनही प्रभावीपणे अमंलबजावणी होत नाही, त्यामुळेच पुनर्वसनही रेंगाळले आहे.

निधी उपलब्ध झाल्यास घळभरणी होऊ शकते. मात्र, पुनर्वसन झाल्याशिवाय घळभरणी होऊ देणार नाही, अशी भूमिका धरणग्रस्तांची आहे. निधीसाठी शासनस्तरावर आमदार हसन मुश्रीफ, पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व कृती समित्या प्रयत्नशील आहेत. एकीकडे धरणाचे काम अंतिम टप्यात असताना बंधारे मात्र कोठेच नाहीत. आंबेओहळ पात्रात गिजवणे, करंबळी, शिप्पूर, जखेवाडी या भागात एकही बंधारा झालेला नाही. सात बंधारे केव्हा व कोठे बांधणार यांची माहिती प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकºयांना नाही.

उत्तूर येथे मोळा नावाच्या शेतानजीक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. मात्र, त्याठिकाणी अद्याप काहीच काम झालेले नसल्याने ग्रामस्थांनी नाल्याच्या पलीकडे जाण्यासाठी जुजबी लोंखडी पूल उभा केला आहे. त्या धोकादायक पुलावरूनच शेतकºयांची वाहतूक सुरू आहे.मंजूर पैसे पुनर्वसनासाठीउर्वरित कामासाठी नाबार्डकडून ४७ कोटी मंजूर झाले. मात्र, त्यातील १७ कोटी पुनर्वसनासाठीच खर्ची पडले. उर्वरित निधी शिल्लक असूनही धरणाच्या कामासाठी पैसे मिळालेले नाहीत.

आर्दाळला पुलाची मागणीसांडवा आणि धरणादरम्यान आर्दाळची २० एकरहून अधिक जमीन आहे. धरणात पाणीसाठा झाल्यानंतर ‘त्या’ जमिनीकडे संबंधित शेतकºयांनी ये-जा कशी करायची, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी साकव-पुलाची गरज आहे.

 

दोन दशकांपासून रखडलेला हा प्रकल्प, त्यामध्ये गुंतलेला पैसा, धरणग्रस्तांचे पुनर्वसन व काम, आदींची पूर्तता करण्यासाठी आता राज्यपालांना विनंती करणार असून, पुनर्वसन झाल्याशिवाय घळ भरणी करू देणार नाही. शासनाने धरणग्रस्तांचा अंत पाहू नये.- शिवाजी गुरव,संग्राम धरण ग्रस्त संघटना.आंदोलने, मोर्चे, शासकीय बैठका, पुनर्वसनासाठी मारावे लागणारे हेलपाटे, आदींना आम्ही थकलो आहोत. आमच्या पुढच्या पिढीला तरी धरणाचा लाभ होणार का ?- शंकर पावले,धरणग्रस्त आर्दाळ. 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर